1 जर मी हरलो तर ?

हाच प्रश्न आहे ना तुम्हाला अडवतोय काहीही चांगलं करण्यापासून ,आपले स्वप्न मिळवण्यापासून ,तेव्हा हा एकच प्रश्न येईल पाहिले की जर मी fail झालो तर हे करताना ,एवढी सगळी मेहनत फुकट जाईल माझी ,एवढे पैसे फुकट जातील ,सगळं वाया जाईल ,सोड जाऊदे मी हे नाही करत ,हाच बरोबर विचार त्या वेळेला तुमच्या डोक्यात चालू राहील ,

आणि त्याच क्षणाला 98% लोक हार मनतात आणि जे नाही करायचं आहे ते करतात ,

मला एक गोष्ट कळत नाही तुम्ही प्रयत्न करण्याआधीच कस अस विचार करू शकता की मला हे जमणार नाही वेगरे ,

आणि भर टाकतात ती आजूबाजूची लोक की हे करू नकोस यात risk आहे ,नाही झालं तर काय करशील ..😞

एकतर आधीच आपण negative असतो त्यात हे ऐकल्यावर तर तो विचार पण नाही करत आपण ...

आणि तुम्हाला माहीत आहे इथूनच सगळं चालू होतं, मग ते problems चालू होतात त्या कामात जे आपल्याला नाही आवडत ...

ज्या दिवशी तुम्ही failure ला न घाबरता पुढे जाल ना त्या दिवशी तुम्ही खरे जिंकाल कारण ते सगळ्यांनाच नाही जमत ..

मग त्यानंतर भलेही तुम्ही हराल पण तुम्हाला प्रयत्न करण्याचा दुःख नाही होणार हे लिहून ठेवा ...

खूप जणांना दुःख होत नंतर की मी हे नाही केलं , जेव्हा त्याचं वय होत आणि तेव्हा ते काहीच नाही करु शकत ,

म्हणून आताच तुमच्याजवळ खूप वेळ आहे काहीतरी करू दाखवण्याचा ,म्हणून आता मागे नका हाटु ,आणि failures आल्याशिवाय कोणीही succesfull होत नाही हे नेहमी लक्षात ठेवा म्हणून त्याला घाबरू नका ,sucess तुमची पुढे वाट बघत आहे ..🔥😊

avataravatar